वसुंधरा अभियान बाणेर, आयोजित रक्तदान शिबिर मध्ये 263 जणांचे रक्तदान

बाणेर : वसुंधरा अभियान बाणेर आयोजित रक्तदान शिबिर मध्ये 263 नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेमार्फत तुकाई टेकडीवर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्य 2006पासून चालू आहे.
पर्यावरण कार्याबरोबरच संस्था इतर सामाजिक कार्यात देखील नेहमीच अग्रेसर असते. संस्थेने आतापर्यंत तुकाई टेकडीवर 48 हजार झाडांचे जंगल केले असून, महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.
वसुंधरा अभियान मार्फत प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, ज्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होऊन जीव वाचण्यास मदत होते.


वसुंधरा अभियान बाणेर ने आयोजित तेराव्या रक्तदान शिबिरामध्ये 263 जणांनी रक्तदान केले. या रक्तदानामुळे किमान हजारो रुग्णांना फायदा होणार असून ,वसुंधरा अभियानच्या सर्व टीमच्या योगदानामुळे, संस्थेच्या इतिहासातील सर्वोच्च असे रक्तदान झाले ..
सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन रक्तदान घेण्यात अग्रेसर असणारे पर्णल देखने , 178 वेळा  रक्तदान करणारे राम बांगड व माजी सैनिक चंदू सुतार  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या अंतर्गत जवळपास 400 सदस्यांनी सदिच्छा भेट देऊन वसुंधरा कार्यास सदिच्छा दिल्या.

See also  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दीपोत्सवाला नवा आयाम !