महसूल व वनविभागाच्या अखत्यारित किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी कार्यवाही हवी -आ.रोहित पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या महसूल व वनविभागाच्या अखत्यारित असलेले किल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

राज्यात सुमारे ४०० गड-किल्ले असून त्यापैकी १२५ किल्ले हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत संरक्षित आहेत तर उर्वरीत किल्ले हे महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत आहेत. या किल्ल्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांची अत्यंत दूरावस्था झाली आहे. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. आपला दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी या किल्ल्यांचं जतन व संवर्धन होणं आवश्यक आहे. त्यामुळं केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयातून या किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती महामहीम राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब यांना केली. त्यांनीही यासंदर्भात योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं.

See also  ’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी