बालेवाडी : बालेवाडी येथील दसरा चौकातील मुख्य रस्त्याचे रुंदिकरणाचे काम भुसंपादनामुळे प्रलंबित होते. अपुर्ण रस्त्यामुळे वाहतुक कोंडी व अपघातांची मालिका सातत्याने या चौकामध्ये वाढत चाललेली होती.
यावर तातडीने उपाययोजना करत हा रस्ता पुर्ण करण्याकरीता अमोल बालवडकर यांनी संबंधित जागामालकांशी विनंती व चर्चा करुन मार्ग काढला व जमिन मालकांचे समाधान केले. त्यामुळे कोणताही वाद-विवाद न होता विकासाचे काम सुरु झाले. जमिन मालक व प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधुन आता या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
कोणतेही विकासकाम करत असताना संबंधित जागा मालकाचे समाधान करणे व प्रशासनाशी समन्वय साधणे हे महत्त्वाचे असते.
निश्चितच या रस्ता रुंदिकरणामुळे या चौकातील वाहतुक कोंडी संपुष्टात येईल व अपघात देखिल थांबतील असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.