पाकिस्तानचे दिवस भरले, भारतीय सैन्याचा कडक पलटवार, मिसाइल हल्ल्याने लाहौर हादरलं..

शशिकांत पाटोळे
नवी दिल्ली : लाहोर आणि सियालकोटमध्ये भारतीय सैन्याने गुरुवारी हल्ले केल्यानंतर आता पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये देखील भारतीय सैन्यांने हल्ला केला आहे. रात्री जवळपास सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भारतीय सैन्याने इस्लामाबादला लक्ष्य केले. इस्लामाबादच्या प्रमुख चौकांमध्ये आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरलेले दिसले.


दरम्यान, पाकिस्तानाने एकापाठोपाठ भारतावर हल्ले करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतातील ३ राज्यामध्ये घुसून ड्रोन हल्ले केले आहे. दिवसभरात पाकिस्तानने २ मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याची अमेरिकेनं दखल घेतली आहे. भारतावर हल्ले लगेच थांबवा, तुम्ही लगेच माघार घ्या, अशा शब्दांत अमेरिकेनं पाकिस्तानला खडसावलं.


पाकिस्तानी सैन्याने एकाच वेळी भारताच्या वेगळ्या ठिकाणी अचानक ड्रोन हल्ला केला आहे. सीमारेषेजवळ भ्याड हल्ले केले आहे.  सीमारेषेजवळ असलेल्या जम्मू, राजस्थान आणि पंजाबच्या सीमेजवळ पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये ड्रोन हल्ले केले आहे.  पण भारतीय सैन्याने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचा भ्याड हल्ला जवानांनी परतून लावला आहे. पण पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याचं ४ राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले आहे. या हल्ल्याचं आता भारत कसं प्रत्युत्तर देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

See also  विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यशस्वी करावा- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख