‘अपत्यहीन जोडप्यांना’आयव्हीएफ’मुळे पालकत्वाची अनुभूती’ दोन वर्षात ‘बेनिकेअर’ने २५०० हुन अधिक जणांना बहाल केले मातृत्व; डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे यांची माहिती

पुणे : वाढता ताणतणाव, बदललेली जीवनशैली, स्थूलपणा, पीसीओडीसारखे आजार, उशिरा लग्न होण्यासह शिक्षणाचा अभाव यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी आयव्हीएफ सारखे तंत्रज्ञान मातृत्वासाठी वरदान ठरत असून, अपत्यहीन जोडप्यांना पालकत्वाची अनुभूती देणे शक्य झाले आहे. सहज मातृत्वासाठी भावी पिढीने योग्य ती काळजी घेण्याची गरज असून, त्यासाठी बेनिकेअर मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जागृती करत आहे. गेल्या दोन वर्षात बेनिकेअर हॉस्पिटलने २५०० पेक्षा अधिक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद दिला आहे,” अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे यांनी दिली.

बाणेर येथील बेनिकेअर मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक आयव्हीएफ दिवसाच्या निमित्ताने आयोजित वार्तालापात डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे बोलत होत्या. प्रसंगी बेनिकेअर हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग, प्रसूती व एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. जयदीप पाळवदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरदीप पाळवदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद बालटे, डॉ. सागर राठी, ऍडमिन व बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टन्ट डॉ. राजेश देशपांडे, दंतवैद्यक डॉ. प्रियांका पाळवदे, आदी उपस्थित होते. यावेळी हॉस्पिटलच्या वतीने आयव्हीएफ बद्दल सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन यासाठी चोवीस तास आयव्हीएफ विशेष हेल्पलाईन ९०३९०३७९०० सुरु करण्यात आली.

डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे म्हणाल्या, “मेट्रो-स्मार्ट सिटी मुळे जगण्याचा स्तर उंचावला आहे. मात्र, वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. उशिरा लग्न होण्यासह लग्न झाल्यावरही मूल होऊ न देणे किंवा वेळ घेणे, त्यातून होणारे शारीरिक बदल, येणारे ताण यामुळे मातृत्वाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येतात. पुरुषांमध्येही प्रदूषण, फास्ट व जंक फूड, नशा, व्यसने यासह पुरेशा झोपेचा अभाव आणि त्यातून येणारा ताण यामुळे शुक्राणू निष्क्रिय होतात. अशावेळी योग्य काळजी आणि योग्य वेळी मातृत्वाची संधी घेणे गरजेचे आहे. लग्नाआधी यासंदर्भातील तपासण्या करायला हव्यात. जेणेकरून नंतर नातेसंबंधात तेढ निर्माण होणार नाही.”

डॉ. जयदीप पाळवदे म्हणाले, “टेस्ट ट्युब बेबीद्वारे जन्माला येणारे मूल हे नैसर्गिक पध्दतीने जन्माला आलेल्या बाळासारखेच सामान्य, सशक्त, निरोगी असते. या तंत्रज्ञानामध्ये आपण स्त्रीयांची अंडी बाहेर काढून घेतो, पुरूषांचे शुक्राणू बाहेर काढतो, त्यांचे फलन केले जाते. आयव्हीएफमध्ये होणारे मूल हे त्या जोडप्याचेच असते. आयव्हीएफ प्रक्रिया घेणार्‍या स्त्रीला इंजेक्शन्स देऊन तिच्या शरीरात अंडी तयार केली जातात. ती अंडी योग्य आकाराला पोहचली की बाहेर काढावी लागतात. बाहेर काढल्यानंतर लॅबमध्ये स्त्रीच्या जोडीदाराचे शुक्राणू घेण्यात येतात. ते शुक्राणू धुवून त्यांचे मिलन हे अंड्याबरोबर केले जाते आणि तयार होणारा गर्भ शरीरात सोडला जातो. स्त्रीची अंडी जेव्हा बाहेर काढतात, त्याला ओव्हम पिकअप प्रक्रिया म्हटले जाते. रोपण करण्याची प्रक्रिया वेदनाविरहीत प्रक्रिया आहे. यासाठी हॉस्पिटलमध्ये काही तास विश्रांती घेणे गरजेचे असते. एकदा गर्भ रूजला की, त्यापुढील सर्व प्रक्रिया ही नैसर्गिक असते. एकदा रोपण झाल्यानंतर, उर्वरित गर्भधारणा अत्यंत सामान्य असते. त्यामुळे पूर्ण विश्रांतीची आवश्यकता भासेल असे नाही.”

See also  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

अमरदीप पाळवदे म्हणाले, “अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे बाणेर येथील बेनेकेअर हॉस्पिटल ६० बेडचे आहे. तसेच १५ एनआयसीयू येथे आहेत. माता आणि बालकांच्या उत्कृष्ट आरोग्य सेवेला इथे प्राधान्य दिले जाते. आयव्हीएफ, प्रसूती, स्त्रीरोग, लॅप्रोस्कोपी व हिस्टेरोस्कोपी, बालरोग, दंत, रेडिओलॉजी, फिजिओथेरपी, आहार व पोषण, औषध, पॅथॉलॉजी, स्तनपान सहायता अशा उत्तम दर्जाच्या आरोग्यसुविधा पुरवल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असून, १५ ते २० वर्षांचा अनुभव असलेले स्त्रीरोग, प्रसूती, एन्डोस्कोपी तज्ज्ञ अशा १८-२० डॉक्टरांची टीम, तसेच १०० पेक्षा अधिक नर्सिंग स्टाफ रुग्णांची सेवा करतो. आजवर ६०० पेक्षा अधिक मातांना आयव्हीएफद्वारे यशस्वी मातृत्व प्राप्त करून दिल्याचा आनंद वाटतो.”

डॉ. प्रसाद बालटे म्हणाले, “लवकर प्रसूती झाल्यास, कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यास किंवा बाळाला काहीही त्रास झाल्यास अत्याधुनिक असे ‘एनआयसीयू’ म्हणजे बाळांचे आयसीयूची सोय येथे आहे. चोवीस तास बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली बाळांची काळजी घेतली जाते. त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यामुळे बाळांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होते.”