औंधमध्ये सामुहीक तुलसी विवाह सोहळा

औंध : येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ (वरची तालीम) यांच्या वतीने प्रथच सामुहीक तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

औंध गावातील पहिले मानाचे मंडळ असलेल्या या मंडळाच्या वतीने हनुमान मंदिराच्या प्रांगणात हा विवाह सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, विनोद बोडके, समीर खताळ,दीपक मदने, कुणाल पवार,रोहन शिंदे यांनी पुढाकार घेतला.या सोहळ्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

See also  एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत समारोप