भाजपाने लोकांची घरे पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवण्याचे काम करावे – खासदार संजय जाधव; बाणेर मध्ये मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप

बाणेर : भाजपाने लोकांची घर पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवण्याचे काम करावे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार चुली पेटवणारे आहेत तेच दिलीप मुरकुटे यांच्या कार्यक्रमातून दिसत आहे. नागपूर मध्ये दंगली घडवण्यात आल्या परंतु महाराष्ट्राच्या जनतेने कुठेही महाराष्ट्र पेटू दिला नाही यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सलाम करतो. हे सर्व राजकीय भांडवल आहे हे लोकांनी ओळखले आहे यामुळेच नागपूरच्या घटनेनंतर त्याचे पडसाद कुठेच उमटले नाहीत असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांच्या वाढदिवसानिमित्त व रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन  कुंदन गार्डन बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मौलाना मोहम्मद कासमी, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे, भानुदास पानसरे, बाळासाहेब भांडे, पांडुरंग आप्पा दातार, नामदेवराव गोलांडे, ओम बांगर, शांताराम पाडाळे, राजू शेडगे , युवराज मुरकुटे, रखमाजी पाडाळे, अशोक दळवी विशाल पवार, वसंत चांदेरे, आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक तानाजी निम्हण म्हणाले, सध्याची सामाजिक परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप होत आहे हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. शिवसेना समजून घ्यायचे असेल तर प्रबोधनकार ठाकरे समजून घ्यावे लागतात.

मुस्लिम बांधवांना सरंजाम वाटप परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुस महाळुंगे बाणेर बालेवाडी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांना यावेळी रमजान ईद निमित्त सरंजा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

See also  मराठा समाजातील तरुणांनी न्यूनगंड सोडावा आणि प्रगती करावी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांचे आवाहन