हडपसर : भेकरे नगर येथे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.
जीव घेणे खड्डे पुणे महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्या माध्यमातून हे खड्डे तातडीने वाजवण्यात यावे अशी मागणी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी केली आहे.
खड्ड्यांमुळे होत असलेले अपघात व त्यामुळे नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे. तसेच अनेक नागरिकांचे वेळेचे व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. वारंवार मागणी करून देखील खड्डे वेळच्यावेळी मोजवले जात नाहीत. शासनाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्डे वेळेत न मुजवल्यास अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी दिला आहे.