पुणे : दिनांक १९ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीच्या पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरराव धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश व अन्य नेत्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे पुण्यातील मुख्यालय ‘ स्वराज्य भवन ‘ ला भेट दिली.
यावेळी झालेल्या औपचारिक चर्चेनंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना तिसरी आघाडी ही महाराष्ट्रात स्थापन होत असून महाराष्ट्राला एक सक्षम पर्याय आम्ही देणार असल्याचे प्रतिपादन स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
या नंतर पुण्यात VVIP सर्किट हाऊस येथे बैठक व त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद आयोजित केली जाणार असल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली.