ताम्हिणी घाटात प्रवास होणार सोपा व सुरक्षित दहा किलोमीटरचा बोगद्याच्या पर्यायी मार्गच नियोजन

पौड : ताम्हिणी घाटात हा दहा किलोमीटरचा घाट असून सतत होणारे अपघात व दगडी कोसळल्या मुळे वाढणारा धोका मुसळधार पावसामुळे रस्ते बंद होण्याचा त्रास थांबणार आहे.

आत्ता ताम्हिणी घाटामध्ये मोठे अपघात व दळणवळणाच्या कंटेनर जात असल्याने नागरिकांना त्रास अपघात व रस्ता मुसळधार पावसामुळे बंद होण्याचा त्रास हा आता बोगद्यामुळे थांबणार आहे. पुणे रायगड हा दहा किलोमीटरचा मार्ग असून ताम्हिणी घाटापासून ते रायगड पर्यंत बोगद्याचे नियोजन करण्यात येत आहे. सुरक्षित प्रवास वेळेची बचत व वाहतूक सुलभ वेगवान होणार आहे.

ताम्हिणी घाटातून होणारे अपघातांना नागरिकांना खूप वेळा सामोरे जात जावे लागत होते. पण आता या पर्यायी बोगद्या झाल्यानंतर अपघातांची शक्यता कमी होणार आहे.वाहनांचा प्रवास सुलभ होण्यामुळे इंधनाची पण बचत होणार आहे. व वाहने सुरक्षित पोहोचणार आहे.ताम्हिणी घाटात धोकादायक मार्गा होता आत्ता रस्त्याला एक नवीन दिशा बोगद्यामुळे मिळण्याची शक्यता आहे.

See also  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने बाणेर येथे रमजान ईद निमित्त सरंजाम वाटप होणार