अपघातात एखादा गेला तर लोक म्हणतात एक देवेंद्रवासी झाला शरद पवारांचा फडणवीस यांना टोला,तर गोवारी हत्याकांड व मावळचा गोळीबारातील मृत्युमुखी पडलेले शरदवासी झाले भाजपाच्या बावनकुळे यांचे प्रतीउत्तर

पुणे : अपघातात एखादा गेला तर लोक म्हणतात एक देवेंद्रवासी झाला शरद पवारांचा फडणवीस यांना टोला लगावत फडणवीसनवर टीका केली. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिउत्तर देत गोवारी हत्याकांड व मावळचा गोळीबारातील मृत्युमुखी पडलेले शरदवासी झाले असे म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित केला. समृद्धी महामार्गावरील अपघातांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सध्या एकमेकांवर ठिकाणची झोड उठवली जात आहे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. २५ लोकांचा बळी जाणं ही बाब वेदना देणारी आहे. कदाचित शास्रीय दृष्ट्या नियोजन केलेलं नसावं. त्याचा दृष्परिणाम असा आहे. लोक मृत्यू होत आहेत. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात. नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात. असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले आहेत. शरद पवार गोवारी हत्याकांड विसरले आहेत. शरद पवार मावळचा गोळीबार विसरले आहे. शरद पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले आहे. हे सगळेच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले असे भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणत शरद पवारांना टिका केली आहे.

गोवारी हत्याकांड घडले, तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार साहेब त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही. पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का? पवारसाहेब, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले. पवारसाहेब, तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली. असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

See also  अजितदादा पवार हे 65 वर्षाचे सीनियर सिटीजन आहेत - खासदार सुप्रिया सुळे