महाराष्ट्रात २६ एप्रिल ते २५ मे या दरम्यान पाच टप्प्यांत निवडणूका, पुण्यात 13 मे ला मतदान.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून  देशात १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात २६ एप्रिल ते २५ मे या दरम्यान पाच टप्प्यांत निवडणूक पार पडल्या जातील.

लोकसभा निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी ४ जूनला लागेल. निवडणुकीच्या संदर्भातील ही घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केली. 

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे.  १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३मे आणि २० मे या तारखांना एकूण पाच टप्प्यांत मतदान होईल.

तारीख आणि त्या दिवशी मतदान होणारे मतदारसंघ पुढीलप्रमाणे

१९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
२६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
७ मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
१३ मे – नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
२० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई-उत्तर, मुंबई – उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व), मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई

See also  कंत्राटी भरती हे पाप आहे एवढे मान्य केलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे!आदेश मागे जनतेमधील रोषाचा परिणाम : आम आदमी पार्टी