येरवडा जय जवान नगरमध्ये गटाराचे पाणी घुटण्यापर्यंत – अमृतेश्वर गणेश चौक परिसरात रोगराईचा धोका

पुणे:  गेल्या दोन महिन्यांपासून येरवडा येथील जय जवान नगरमधील अमृतेश्वर गणेश चौक व परिसरातील दोन प्रमुख रस्ते अक्षरशः गटाराच्या पाण्याने डबक्यात रूपांतरित झाले आहेत. रोज पहाटेपासून दुपारपर्यंत लाखो लिटर गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर साचलेले असते. अनेक ठिकाणी गटारांचे झाकण तुटलेले असून, तिथून बोरवेलप्रमाणे जोरात पाणी बाहेर पडते आणि संपूर्ण वसाहत घुटणापर्यंत पाण्यात बुडते.

या परिसरातील नागरिकांना या गटाराच्या पाण्यातूनच आपले दैनंदिन जीवन चालवावे लागत आहे. विशेष म्हणजे, जिथे हे पाणी साचते त्याच ठिकाणी श्री अमृतेश्वर गणेश मंदिर आहे. मंदिराच्या तीनही बाजूंनी गटाराचे पाणी साचलेले असते. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते आणि मंदिराच्या पायऱ्या देखील पाण्याखाली जातात. दुचाकी गाड्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे वाहनधारक देखील त्रस्त झाला.

या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, तर संपूर्ण परिसरात सार्वजनिक आरोग्याचे गंभीर संकट उभे राहू शकते. महापालिका प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.

See also  विसाव्या दिव्य कला मेळयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन