पिरंगुट : ” पत्रकारांनी सकारात्मक बातम्या देऊन समाजात अनुकूल बदल घडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लोकशाहीतील तीन स्तंभाना दिशा देणारा पत्रकारिता हा महत्वाचा चौथा स्तंभ आहे. सध्याचे युग हे अतिशय वेगवान असून पत्रकारितेचा प्रिंट मीडिया पासून सुरु असलेला प्रवास आता डिजिटल मिडियापर्यंत पोहचलेला आहे. वेगवान बातमीदारीत खऱ्या खोट्याची पडताळणी करताना अनेकदा चुकीचे वृत्त येण्याची शक्यता असते. तसेच अनेकदा नकारात्मक बातम्यांचे प्रमाण अधिक असते यामुळे समाजात नकारात्मकता तयार होण्याची भीती असते. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक बातम्या देऊन अनुकूल बदलासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. ” असे मत तहसीलदार रणजित भोसले यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट (ता.मुळशी) येथील अनंतराव पवार महाविद्यालयातील जनसंवाद व वृतपत्रविद्या विभाग आणि पत्रकार संघ मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात भोसले बोलत होते. यावेळी पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी , प्राचार्य जी.बी.लोबो, राजेंद्र बांदल, शांताराम इंगवले, गंगाराम मातेरे, दीपक करंजावणे , सचिन खैरे, बाबाजी शेळके ,प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले ,राम गायकवाड, रामचंद्र देवकर ,भानुदास गोळे, शरद गोंडाबे ,मोहन गोळे, भाऊ केदारी, संतोष गोंडाबे, भिमाजी केसवड , महेश वाघ, प्रदीप गोडांबे, हनुमंत चोंधे, अनिल पवार, दत्ता देवकर ,उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, प्रा. शहाजी शिंदे, प्रा.दिलीप सोनावणे ,डॉ.श्रीकांत देशमुख, डॉ.किसन पालके, डॉ. अभय पाटील , मिनाली चव्हाण , भरत कानगुडे, अनिल मरे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संतोष गिरीगोसावी म्हणाले , समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी बातम्याही सकारात्मक असणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकारांनी सजग राहून पत्रकारितेची भूमिका जबाबदारीने आणि सामाजिक बांधिलकी जोपासून निभावली पाहिजे. यावेळी प्राचार्य डॅा. लोबो , पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष निलेश शेंडे, संजय दुधाणे, बबन मिंडे, राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे, महादेव पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्ज्वलन , दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्य़े वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून खुल्या ग्रंथालयाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते . यावेळी उपस्थितांनी महाविद्यालयातील वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील स्वाती गोळे यांनी केले. महाविद्यालातील जनसंवाद व वृतपत्रविद्या विभागाच्या प्रमुख अश्विनी जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश शेंडे, धोंडीबा कुंभार, पत्रकार रमेश ससार , सागर शितोळे , प्रदीप पाटील , केदार कदम, महेश मालुसरे , साहेबराव भेगडे ,मकरंद ढमाले , पपू कंधारे , पांडुरंग साठे , केतन सुर्वे यांनी नियोजन केले.