प्रसन्न पप्पू कंधारेची कोपरगाव शिर्डी येथे झालेल्या झोनल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

पौड : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कविता पप्पू कंधारे यांचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसन्न पप्पू कंधारे यांनी कोपरगाव या ठिकाणी झालेल्या झोनल स्पर्धेत वय 19 वर्षे गटातून झोनल स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावून शिर्डी या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील सुवर्णपदक मिळवले आहे. प्रसन्न कंधारे यांच्या सुवर्णपदकांमध्ये अजून पदकांची भरीव भर पडली आहे.


महाराष्ट्र शासन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने क्रीडा अधिकारी कसगावडे यांच्या मान्यतेने शालेय क्रीडा झोनल स्पर्धेचे आयोजन कोपरगाव या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत कै पंडितराव आगाशे इंग्लिश मिडीयम स्कूल लॉ कॉलेज रोड पुणे या संस्थेतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसन्न पप्पू कंधारे यांनी शालेय सिलंबम स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा 2024 -2025 , वय  19 वर्षे मुले गटातून आंतरराष्ट्रीय खेळाडू  कु प्रसन्न पप्पू कंधारे यांनी सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्रातील संघातून खेळण्यासाठी आपले नाव कोरले आहे.


या स्पर्धेचे आयोजन संस्कृती मंगल कार्यालय निमगाव कोऱ्हाळे शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्या नगर ज्ञानेश्वर खुरंगे , उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे विभाग युवराज नाईक यांच्या कडून प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रसन्न कंधारे यांनी सांगितले की, महाराष्ट्र कडून खेळत असताना खेलो इंडिया पर्यंत पोहचणे हे स्वप्न आहे. कबड्डी कुस्ती खेळा बरोबर सिलंबम हा मर्दानी खेळ असल्याने मला त्याची आवड निर्माण झाली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या खेळाला प्रोत्साहन मिळत होते या खेळांनी अनेक शत्रुना पाणी पाजले आहे. कोणत्याही खेळावर कोणत्याही खेळात फक्त अन्याय झाला नाही पाहिजे. सत्य खेळाडूंना ज्ञाय मिळाला. खेळाडूंना आर्थिक मदत मिळेल या कडे देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही खेळाडू खेळापासून वंचित राहत आहेत. यामुळे देशाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

See also  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन