पाकिस्तानातील दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक करत भारतीय लष्कराने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला

दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील विविध दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करत बदला घेतला.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.  या ठिकाणांवर असलेल्या दहशतवाद्यांची माहिती आधीच गोळा करण्यात आली होती.

ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय लष्कराकडून  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. याबाबत भारतीय लष्कराच्या इंडियन आर्मी या एक्स अकाऊंटवरून ऑपरेशन सिंदूर अशी पोस्ट करीत याची माहिती दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि रशिया यासारख्या देशांतील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारताने उचललेल्या पावलांची माहिती दिली आहे.

See also  पीआयसीटीमध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धांचा जल्लोषात प्रारंभ