निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का करत नाही ? – नाना पटोले

मुंबई : निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का करत नाही ? भाजप नेत्यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी उचलेले मुद्दे खोडून काढावेत असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसने मतांच्या चोरीचा प्रश्न उपस्थित केला असता भाजपा नेतेच त्याला उत्तर देत आहेत. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली. आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत. भाजपाचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का. शिर्डी मतदारसंघात ७ हजार मतदार कसे वाढवले याचे पुरावे आहेत. ज्या मतदारसंघात मतदारांची जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपाला मिळाले आहे. आम्ही पुराव्यानिशी मतदारयाद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिम्मत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे असे नाना पटोले यांनी सांगितले.

See also  मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार