कुंडमळा पुलासाठी आठ कोटी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर ठेंगा! या घटनेला जबाबदार युती सरकारच – आम आदमी पार्टीचा आरोप

मावळ : कुंडमळा पुलासाठी आठ कोटी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर ठेंगा दाखवला आहे या घटनेला जबाबदार युती सरकारच आहे असा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.

अत्यंत दुर्दैवी आणि सामान्य माणसाला हतबल बनवणाऱ्या घटनांची मलिका काही संपत नाही. कुंडमळा येथे घडलेली घटना अत्यंत वेदनादायी असली तरी याला जबाबदार कोण हे कधीतरी विचारायला हवेच. निवडणुकीच्या पूर्वी भाजपच्या नेत्यांनी आणि राज्य सरकारने आठ कोटी मंजूर केल्याचे तब्बल एक वर्षांपूर्वी जाहीर केले होते व मावळातील लोकांनी त्याचे धन्यवाद मानले होते. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात बोगस लाभार्थी बनवण्यासाठी निधी भरपूर होता पण या सुरक्षेच्या कामांना प्राथमिकता मिळालीच नाही. त्याची परिणीती हा अपघात आहे . सर्व पुलांचे ऑडिट करणे अशी जुजबी प्रक्रिया केली जाईल, परंतु त्याने प्रश्न सुटत नाही. सामान्य माणसाची सुरक्षा याला प्राथमिकता नाही हे दुर्दैव आहे. असे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

See also  समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन