पुणे: राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारांची पेरणी होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुण्याच्या कोथरूडमध्ये असेच एक ‘समरसतेचे’ चित्र पाहायला मिळाले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केवळ औपचारिक अभिवादन न करता, आपल्या ‘देवाशिष’ निवासस्थानी समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र आणून एक नवा आदर्श निर्माण केला.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेला ‘समानता आणि बंधुभाव’ हा मंत्र केवळ भाषणांतून न सांगता, चंद्रकांतदादांनी तो आपल्या कृतीतून दाखवून दिला. कोथरूडमधील सफाई कामगारांपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत आणि कष्टकरी महिलांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजणांना एकाच छताखाली एकत्रित आणून महामानवाला अभिवादन केले.
याप्रसंगी भन्ते डॉ. हरिषबोधी महाथेरो, भिक्खू हर्षवर्धन थेरो, भिक्खू आनंद मेत्ता, भिक्खूणी धम्म दर्शनी आणि भिक्खूणी महाबोधी मेत्ता यांनी उपस्थित राहून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आशिर्वाद दिले. ना. पाटील यांनीही भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने ‘चिवरदान’ करून आपला आदर व्यक्त केला. यानंतर उपस्थित सर्व भन्ते आणि भिक्खूंनी सर्व अनुयायांना तसेच नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या.”
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कोणतीही मोठी व्यासपीठे की लांबलचक भाषणे नव्हती. तर फक्त आपुलकी आणि संवाद होता. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी दादांनी वैयक्तिक विचारपूस केली. तसेच, बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणात येणे हेच त्यांना अभिवादन आहे, हा संदेश त्यांनी उपस्थितांवर बिंबवला.
या कार्यक्रमास उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आणि सामाजिक कार्यकर्ते एस. के. जैन, रिपाइं गटाचे सचिन खरात, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, संजय सोनवणे, अशोक धिवरे, अविनाश साळवे, रत्नाकर गायकवाड, डॉ. विजय खरे, अतुल साळवे, डॉ. प्रशांत पगारे, ॲड. भाई विवेक चव्हाण, राहुल डंबाळे, यशवंत नडगम, सिताराम गंगावणे, ॲड. महेश सकट, हिमाली कांबळे, नगरसेविका पल्लवी जावळे, अश्विनी भंडारे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, संजय सोनावणे, रावसाहेब राखपसरे, राजू जाधव, महेंद्र कांबळे, उमेश चव्हाण यांच्यासह पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारामुळे कोथरूडमध्ये ‘एकता आणि समतेचा’ एक नवा आदर्श प्रस्थापित झाला. दादांच्या या संवेदनशील पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “हेच आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण,” अशी भावना उपस्थितांनी याप्रसंगी व्यक्त केली.
























