![](https://punebulletin.com/wp-content/uploads/2023/05/img-20230528-wa00691150218872138334582-1024x681.jpg)
पुणे : पुणे काँग्रेस भवन येथे अखिल भारतीय कांग्रेस कमिटी च्या प्रवक्त्या विंग कमांडर श्रीमती आनुमा आचार्य यांनी सर्व पत्रकारांशी वार्तालाप केला आणि ९साल, ९ सवाल ह्या पुस्तीके चे विमोचन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की मोदी सरकार दलीत आदिवासी यांचे बद्दल खोटे प्रेम दाखवितात. फक्त मताचे राजकारण . आज मोदी सरकार नी आपल्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मु यांना पार्लमेंट च्या उद्घटनाला न बोलवून आपली मनुवादी वृत्ती दाखवली आहे. तेव्हा हा सगळा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. लोकांना कळले आहे हे सरकार खूप जातीयवादी आहे. करनी आणि कथनी दोन्हीत फरक आहे.
![](https://punebulletin.com/wp-content/uploads/2023/05/img-20230528-wa00891383978504065490511-682x1024.jpg)
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाज्जेड , माजी महापौर कमल व्यवहारे , महारष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, नीता राजपूत , माजी नगरसेवक सुजाता शेट्टी, माजी नगरसेवक रफिक शेख, सचिन आडेकर, विशाल गुंड , गुलाम शेख, रवी आरडे उपस्थित होते.