अजितदादा पवार हे 65 वर्षाचे सीनियर सिटीजन आहेत – खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित दादा पवार हे ६५ वर्षाचे सीनियर सिटीजन आहेत याबाबत वक्तव्य केले.

खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या- राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास थांबला आहे; सर्वसामान्य मायबाप जनतेने आपले प्रश्न मांडायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– वीज, पाणी व रस्ता यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी पुण्यातील लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे.
– पोलीस यंत्रणा व पुणे मनपाचे ट्रॅफिक वॉर्डन्स यांच्या सुसंवाद नसल्याने पुण्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आहे; ती सुरळीत करण्यासाठी पालिकेला सूचना केल्या आहेत.
– पुण्यात जानेवारी महिन्यातच पिण्याचे पाणी, गुरांचे पाणी व शेतीच्या पाण्याची कमतरता जाणवत असून त्यासाठी आवर्तन येणे गरजेचे आहे.

– भाजपच्या जाहीरनाम्यात पुण्याला २४ × ७ पाणी देण्याचे आश्वासन होते पण तसे होताना दिसत नाही; सरकारला विनंती आहे की हा प्रश्न लाईटली घेऊ नका.
– कांदा व दुधाला भाव नाही आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते; ही गरिबांची चेष्टा आहे.
– ‘जलजीवन मिशन’ हा प्रोग्रॅम चांगला आहे पण त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही त्यात कमतरता जाणवते.
– सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही व चर्चा करायची नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
– भ्रष्ट जुमला पार्टी पुणेकरांना फसवून सत्तेत आली आहे; त्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले पाहिजे.

– अजित दादा ६५ वर्षांचे सीनियर सिटीजन आहेत; भारतीय संविधानानुसार त्यांनी राजकारणातून कधी निवृत्त व्हायचे? हा त्यांचा अधिकार आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व आदरणीय पवार साहेबांची पॉलिसी ही कधीच एका व्यक्तीवर बोलण्यासाठी राहिलेली नाही.
– अरे ला कारे म्हणणे सोपे असते ताकद लागत नाही पण शांत बसून सहन करण्यासाठी जास्त ताकद लागते.
– आज महाराष्ट्र दिल्लीच्या आदेशाने चालत आहे; राज्याला नेतृत्व नाही.
– पुण्याचा विकास आराखडा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे; तो लवकर पूर्ण झाला पाहिजे.
– निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे; आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्षाचे ३६५ दिवस आणि २४ तास निवडणुकांसाठी तयार असतो; अदृश्य शक्तीची आम्हाला भीती वाटत नाही.
– प्रकाश आंबेडकर लोकसभेत निवडून आले तर सभागृहातील चर्चेचा दर्जा आणखी उंचावेल; इंडिया आघाडीतर्फे निवडून आले तर स्वागतच आहे.
– बिल्कीस बानो केस संवेदनशील होता; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत आहे.

See also  राज्यात कायदा आणि सुरक्षेचे तीन तेरा आपचा आक्रोश मोर्चा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी