महावीर जयंती निमित्त आनंद दरबार येथे ‘अहिंसारत्न’ पुरस्काराचे वितरण

पुणे :  शाकाहार व अहिंसेच्या मूल्यांवर आधारित जीवनशैली स्विकारल्याबद्दल शिवाजीराव काळोखे व रामभाऊ बेलदरे यांना महावीर जयंती निमित्त “अहिंसा रत्न” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

आनंद दरबार येथे आयोजित या कार्यक्रमात बाळासाहेब धोका यांनी उपाध्याय गुरुदेव गौतममुनिजी  व उपस्थितांचे स्वागत केले. मुनिजींनी ‘अहिंसा’ या जैन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत मूल्यावर आपले विचार मांडले. अहिंसेचे महत्त्व व आजच्या काळातील त्याची गरज यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हभप  गणेश महाराज भगत, गणेशजी ओसवाल , आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व माजी नगरसेवक युवराजजी बेलदरे हे उपस्थित होते. सकाळी पारसमलजी धोका यांचे निवासस्थान ते आनंद दरबार दरम्यान शोभा यात्रा काढण्यात आली होती. या कार्यक्रमास शेकडो लोकांनी उपस्थित लावली होती.संतोष दुगड, प्रमोद रांका यांचे मोलाच सहकार्याने लाभले. सौरभ धोका यांनी आभार मानले.

See also  समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस