पुणे मनपातील राज्य सरकारमधील कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची माजी नगरसेवक उज्वल केसकर यांची मागणी

पुणे  : राज्य सरकारमधील अधिकारी यांचा कालावधी पुण्यामध्ये पूर्ण झाला आहे त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी भाजपाचे माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनावर मुदत पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करावे. राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेमध्ये आस्थापनेवर काम करण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे असे अधिकारी अद्यापही कार्यमुक्त करण्यात आले असल्यामुळे कार्यरत आहेत. अशा अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे पुण्याचे आयुक्त नवल किशोर यांच्याकडे करण्यात आली.

See also  शिवरायांची वाघनखे, जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद