सातारा : मैत्री युवा प्रतिष्ठान तर्फे पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसाठी नाष्ट्याचा कार्यक्रम फलटण तालुक्यातील विडणी येथे आयोजित केला होता.
सर्व साहित्य मिळून जवळपास एक टन कांदेपोहे व उपीट असा नाष्टा वाटप मैत्री युवा प्रतिष्ठानच्या सभासद, मित्रपरिवार व देणगीदार यांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडला.
मैत्री युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले, मनोज बाठे ,मिलिंद आहेर , सागर गायकवाड, उद्धव वांजले तसेच पदाधिकाऱ्यांकडून उत्तम नियोजन करण्यात आले होते.