ऑल इंडिया बीएसएनएल , टेलिकॉम एलआयसी, बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

पुणे : एल.आय.सी., बॅंक, टेलीकॉम ,या संघटनांनी पुकारलेल्या धरणा आंदोलनात पुणे शहरात सकाळी ११ते २या दरम्यान PGMT ऑफिस , सातारा रोड, पुणे या ठिकाणी धरणा आंदोलन करण्यात आले.ऑल इंडिया बीएसएनएल डीओटी पेन्शनर्स असोसिएशनमहाराष्ट्र एंन्ड गोवा सर्कल”केंद्रीय कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन”संपूर्ण भारतात राष्ट्रीय सहा कामगार संघटनांनी ” धरणे आंदोलन” सहभाग घेतला.

या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने बीएसएनएल व डी.ओ.टी. चे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. दिनांक ११/१/२०१७ पासून रखडलेले पेन्शन रीवीजन १५ टक्के सहित सर्व बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावि. कोरोना काळातले १८ महिन्याचा थकीत IDA मिळावा. महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यात सीजीएचएसचा दवाखाना उघडण्यात यावा. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना फीक्स मेडिकल अलाउन्स‌रुपये १०००ऐवजी दरमहा रुपये ३००० मिळावा.रिस्टोरेशन ऑफ फुल्ल पेन्शन पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षे मर्यादा करण्यात यावी, सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


यावेळी ऑल इंडिया बीएसएनएल व डीओटी पेन्शनर असोसिएशनचे महाराष्ट्राचे परिमंडळ सचिव युसुफ जकाती, महाराष्ट्र बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नागेश नलावडे,AIBDPA उपाध्यक्ष शशांक नायर, अखिल भारतीय सहसचिव पुष्पा फराटे, बबन सूर्यवंशी, पुणे जिल्हा सचिव नफीस काजी, अध्यक्ष नरेंद्र माने, संभाजी मस्तुद , यांनी मार्गदर्शन केले.व केंद्र सरकारकडे जोरदार मागणी केली.केंद्र सरकारने चालवलेली अन्यायकारक नितीत बंद केली पाहिजे, आणि आमच्या मागण्या ताबडतोब मान्य केले पाहिजे अन्यथा २१ जुलै २०२३ ला दिल्लीमध्ये केंद्र सरकार विरूद्ध वरील मागण्या संदर्भात भव्य मोर्चा काढण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले.

See also  संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण