पुणे: घारडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खेड, रत्नागिरी येथे आयोजित कोडबिट्स-३.० स्पर्धेत भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विद्यार्थिनी श्रुती भूमकर, सानिका चौधरी, मानसी देशमुख आणि समृद्धी देशमुख यांनी “नेक्स्ट-जन कम्युनिकेशन: एआय-ड्रिव्हन व्हिडिओ ट्रान्सलेशन टू साइन लँग्वेज” या नाविन्यपूर्ण प्रकल्पाद्वारे आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य सिद्ध करत प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला. त्यांच्या अथक परिश्रम व कौशल्याच्या प्रमाणपत्र व ₹१०,०००/- रोख बक्षिसाने त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या प्रोत्साहनपर शब्दांमुळे महाविद्यालयाच्या नावीन्यपूर्ण संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या बांधिलकीचा प्रत्यय येतो.
या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थिनींना संगणक अभियांत्रिकी विभागाचे मार्गदर्शक प्रा. व्ही. डी. कुलकर्णी आणि विभागप्रमुख प्रा. डी. डी. पुकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन विद्यार्थिनींना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी प्रेरित करणारे ठरले.
घर साहित्य/शैक्षणिक कोडबिट्स-३.० स्पर्धेत भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी!