शहरातील इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढा अन्यथा आयुक्तांना जलपर्णीचा हार घालू – रविराज काळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने वारंवार कामे दिली आहेत. आजपर्यंत गेल्या एक वर्षात अंदाजे 8 कोटी रुपयांची कामे थेट पद्धतीने देऊन सुद्धा जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसत आहे.

गेले दिड वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आपण काम पाहत आहे. परंतु शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालू आहे.आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आली होते. मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का? याच ठेकदारांवर सतत जलपर्णी वरून आरोप होत असताना कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने काम का दिले का दिले जात होते? आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे एवढेच काम महानगरपालिकेकडून होत होते का? असा प्रश्न आम आदमी पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

महानगरपालिकेचे बोधवाक्य बदलण्याची हीच योग्य वेळ आहे "कटिबद्ध जनहिताय"बदलून "कटिबद्ध ठेकेदार" हिताय असे जाहीर करावे एवढेच महानगरपालिकेकडून बाकी राहिले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तिन्ही नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नाही.

ठेकेदाराप्रमाणेच पावसाच्या पाण्याने जलपर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जलपर्णी वाहून जाण्याची वाट प्रशासन पहात आहे. आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू अन्यथा महानगरपालिका आयुक्त म्हणून आपणास त्याच जलपर्णीचा हार करून घालू असे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.

See also  बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धिरेंद्र शास्त्री अखेर तुकोबा चरणी नतमस्तक